उद्योग सेतू
उद्योग सेतू उद्योजकांना उद्योगाशी निगडीत विविध शासकीय कायदे, नियम व योजनांची माहिती उपलब्ध करुन देणे, सेवेचा दर्जा वाढविणे, उद्योग उभारणीसाठी विविध शासकीय व निमशासकीय संस्थांकडून लागणारे विविध परवाने / निपटारा प्रमाणपत्रे / नाहरकत प्रमाणपत्रे / विविध सेवा इत्यादी बाबत मार्गदर्शन करणे आणि एकाच ठिकाणी या सेवा कालमर्यादेत उपलब्ध करुन देण्याचा उद्देश साध्य होण्याकरीता उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. ही उपाय योजना राबविण्यासाठी अभिकरण संस्थेची आवश्यकता असल्याने प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग सेतू कार्यान्वीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथे सर्व प्रथम प्रायोगिक तत्वावर शासन निर्णय क्र.उसेतू-२००४/प्र.क्र.७३४/उ-२, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३१ जुलै, २००४ नुसार दिनांक १५ ऑगस्ट, २००४ पासून उद्योग सेतू सुरु करण्यात आला. याच धर्तीवर महसुल विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, तसेच या व्यतिरिक्त औद्योगिक संघटनांनी मागणी केलेल्या सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, जळगांव, मुंबई (मुं.प्रा.वि.) या जिल्हयांसाठी ...