Posts

“ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर रहा”लेखक – प्रा. अजय बी. कोंगे

Image
“ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर रहा” लेखक – प्रा. अजय बी. कोंगे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे — स्वतःची किंमत ओळखणे. जगात प्रत्येक वस्तूची, प्रत्येक कलेची, प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी किंमत असते. परंतु ही किंमत सर्वांनाच समजेल असे नाही. म्हणूनच ज्यांना आपले मूल्य कळत नाही, त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात आयुष्य वाया घालवू नये. एका प्रेरणादायी कथेत वडील आपल्या मुलाला एक जुने घड्याळ देतात. ते जवळपास दोनशे वर्षे जुने असते. ते विकण्याचा सल्ला देताना वडील मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याची किंमत विचारायला सांगतात. दागिन्यांच्या दुकानात त्या घड्याळाला फारशी किंमत मिळत नाही; भंगाराच्या दुकानात तर ती किंमत आणखी कमी होते. पण जेव्हा तेच घड्याळ संग्रहालयात नेले जाते, तेव्हा त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य ओळखून लाखो रुपयांची ऑफर मिळते. ही कथा केवळ घड्याळाची नाही; ती आपल्या आयुष्याची आहे. आपण कोणत्या ठिकाणी उभे आहोत, कोणत्या लोकांमध्ये वावरतो, आणि कोण आपल्याकडे कशा नजरेने पाहतो — यावर आपल्या किंमतीचा अंदाज लावला जातो. ...

वंजारी समाज

Image
वंजारी हा समाज लढवय्या आहे.मेहनती आहे.या लोकांनी ऊस तोडून जमिनी विकत घेतल्या आहेत.आणि लेकरांच्या शिक्षणासाठी वेळ पडली तर त्याच जमिनी विकल्या आहेत.आज वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. या समाजाला संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या संतांचे अधिष्ठान लाभले आहे.आणि राजकिय क्षेत्रात गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा नेता लाभलेला होता.आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं ऋण फेडले पाहिजे यासाठी वंजारी समाजाला त्यांनी वेगळं आरक्षण दिलं.सोबतच इतर ओबीसीतील जातींचेही वर्गीकरण केले.ओबीसीतील या अतिमागास जातींना त्यामुळे फी माफी झाली.वंजारी समाजाला मिळालेल्या २% आरक्षणाचा आणि फी माफीचा असा फायदा झाला की वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जाता आलं.आईबाप शेतात कष्ट करून आपल्या मुलाच्या राहण्याखाण्याची सोय होईल इतपत पैसे आपल्या पोटाला चिमटा काढून पाठवू लागले.वंजारी समाजातील होतकरू मुलांनीही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत असो किंवा ज्या क्षेत्रात ते उतरतात तिथे आरक्षणातील कट ऑफ ओपन इतकाच असतो. आणि त्यातले त्यात ओपनमधून मेरीट क...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न अतिग्रे, कोल्हापूर : उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा  अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विभागांतील ३० संघांनी आपापली समस्या निवेदने (प्रॉब्लेम स्टेटमेंट) शॉर्टलिस्ट करून त्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे उत्कृष्ट दर्शन या सादरीकरणांतून घडले. कार्यशाळेची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर एम. अराळी,  सीईओ, के आय टी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, कोल्हापूर  यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीची संकल्पना, समस्या ओळख व त्यावर उपाययोजना, व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, निधी स...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन कोल्हापूर : अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी-ब्लॉक येथील सेमिनार सभागृहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याच दिवशी “इंडिया एआय अभियान”  सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना  कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्ष...

"Hazard आणि Risk : औद्योगिक सुरक्षिततेचा पाया" प्रा. अजय बी. कोंगे

Image
Hazard आणि Risk : औद्योगिक सुरक्षिततेचा पाया (Industrial Safety – Academic Article) प्रस्तावना औद्योगिकीकरणामुळे उत्पादनक्षमता वाढली असली, तरी त्याचबरोबर अपघात, आजारपण आणि जीवितहानीचे धोकेही वाढले आहेत. या सर्व धोके समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी Hazard (धोका निर्माण करणारा घटक) आणि Risk (त्या धोक्यामुळे होणारी संभाव्य हानी) या संकल्पना औद्योगिक सुरक्षिततेचा पाया मानल्या जातात. इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांसाठी या दोन संकल्पनांचे स्पष्ट आकलन अत्यावश्यक आहे. Hazard म्हणजे काय? Hazard म्हणजे अशी कोणतीही परिस्थिती, वस्तू, प्रक्रिया किंवा कृती जी मानवाला इजा, आजार, मालमत्तेचे नुकसान किंवा पर्यावरणाची हानी करू शकते. 👉 सोप्या शब्दात: Hazard = अपघात घडवू शकणारे कारण Hazard चे प्रकार Physical Hazard (भौतिक धोके) आवाज (Noise) उष्णता व थंडी कंपन (Vibration) प्रकाशाचा अभाव उंचावरून पडण्याचा धोका Chemical Hazard (रासायनिक धोके) विषारी वायू ज्वलनशील द्रव्ये आम्ल व क्षार धूर, वाफ, धूळ Mechanical Hazard (यांत्रिक धोके) फिरती यंत्रे कटिंग टूल्स गिअर, बेल्ट, पुली अपुरे मश...

घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग

Image
शाश्वत विकासावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग  कोल्हापूर आतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल हेल्थकेअर, फूड सायन्स अँड एनर्जी (ICSHFE) २०२६  ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद  उत्साहात पार पडली. यामध्ये 171 संशोधकांनी सहभाग नोंदवला. तर 34 संशोधकांनी पेपर सादरीकरण केले. स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस व स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.    परिषदेसाठी फार्मसी, आरोग्य व संलग्न विज्ञान, अप्लाइड नॅनोमटेरियल्स तसेच लाईफ सायन्सेस या तीन प्रमुख विषयांतर्गत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग होता. विशेष म्हणजे सहभागींपैकी ७० टक्क्यांहून अधिक महिला संशोधक होत्या. यावेळी ४५ पोस्टर सादरीकरणे करण्यात आली. तसेच एका स्टार्ट अपद्वारे नव उत्पादनाचे प्रदर्शनही करण्यात आले.    परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  कुलगुरू प्रा. उद्धव भोसले व विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत यश

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत  यश कोल्हापूर प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ जानेवारी २०२६ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा १८५ सें.मी. व त्यापेक्षा अधिक उंचीच्या गटात घेण्यात आली असून, अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धीरज होळकुंदे याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना धिरज होळकुंदे म्हणाला की, “संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील अत्याधुनिक जिम सुविधा, तसेच जिममधील मार्गदर्शक सचिन बागडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मला सतत प्रेरणा देत राहिले. याशिवाय माझे आई-वड...

लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारचा पद्मश्री सन्मान...

Image
लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांचा पद्मश्री सन्मान भारतीय लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा ही केवळ एक करमणुकीची कला नसून ग्रामीण जीवनाची संवेदना, संघर्ष आणि उत्सव यांचे जिवंत प्रतिबिंब आहे. या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, अशा लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज कलाकार रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारतर्फे २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि समर्पित योगदानाची ही योग्य पावती असून, या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ रघुवीर खेडेकर यांनी तमाशा रंगभूमीवर अखंडपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची मुळे केवळ रंगमंचापुरती मर्यादित नसून, तमाशा या लोककलेच्या जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाशी घट्ट जोडलेली आहेत. त्यांच्या मातोश्री आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेला तमाशा फड त्यांनी अत्यंत जिद्द, कष्ट आणि चिकाटीने आजतागायत यशस्वीपणे सांभाळला आहे. ही परंपरा पुढे नेणे हे त्यांच्या आयुष...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  अंकिता वांडेकर,  सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल,  सहाय्यक निरीक्षक  अनुसया माळी,  निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे  संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह  अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी स...

“संकट अचानक येते, पण तयारी जीवन वाचवते”

Image
"संकट अचानक येते, पण तयारी जीवन वाचवते” सुरक्षिततेचा मूलमंत्र: संकट कधी, कुठे आणि कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. तो अचानक येतो—अपघात, आग, वीजधक्का, रासायनिक गळती, यंत्रातील बिघाड किंवा नैसर्गिक आपत्ती अशा कोणत्याही रूपात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की योग्य नियोजन, शिस्तबद्ध कामपद्धती आणि पूर्वतयारी असेल, तर तोच खतरा जीवघेणा न ठरता नियंत्रित करता येतो. म्हणूनच “संकट (खतरा) अचानक येतो, पण तयारी जीवन वाचवते” हे वाक्य केवळ घोषवाक्य नसून जीवनरक्षक तत्त्वज्ञान आहे. आजच्या औद्योगिक, शैक्षणिक,  जीवन जगताना व बांधकाम क्षेत्रात सेफ्टी इंजिनियरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सुरक्षित कार्यसंस्कृती रुजवणे, धोके ओळखणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यापासून संरक्षणाची प्रभावी व्यवस्था उभारणे हे सेफ्टी इंजिनियरचे मूलभूत कर्तव्य आहे. सुरक्षितता ही केवळ नियमांची पूर्तता नसून ती मानवी जीवनाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. नियोजन आणि संकल्पना सुरक्षिततेचे पहिले पाऊल म्हणजे जोखीम मूल्यांकन (Risk Assessment). कोणत्या कामात कोणते धोके संभवतात, त्यांची तीव्रता किती आहे आणि त्यावर क...