Posts

मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय

Image
 मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय? ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे (सुरुवात 2015 मध्ये झाली). यात निवडलेले युवक जिल्हाधिकारी, CEO, मंत्रालयातील अधिकारी यांच्यासोबत काम करतात आणि धोरण (policy), विकास प्रकल्पांमध्ये योगदान देतात. � Directorate of Economics and Statistics 🎯 मुख्य माहिती (2026 साठी) कालावधी: 12 महिने (Full-time) � The Fellowships कामाचे ठिकाण: मंत्रालय (मुंबई) किंवा जिल्हा स्तरावर काम: शासन प्रकल्प, संशोधन, डेटा विश्लेषण, धोरण अंमलबजावणी 💰 स्टायपेंड (पगार) ₹56,100 प्रति महिना ₹5,400 (प्रवास व इतर खर्च) 👉 एकूण: ₹61,500 प्रति महिना � Directorate of Economics and Statistics +1 🎓 पात्रता (Eligibility) सामान्यतः: वय: 21 ते 26 वर्षे (काही वर्षी बदल होऊ शकतो) शिक्षण: कोणत्याही शाखेची पदवी (Graduation) अनुभव: किमान 1 वर्ष Full-time कामाचा अनुभव (job / internship / self-employment) � Directorate of Economics and Statistics 📝 निवड प्रक्रिया (Selection Process) 2 टप्पे असतात: ऑनलाइन परीक्षा (MCQ) Interview / Personal Interaction � Directorate of Economi...

सेफ्टी ऑफिसर – काळाची गरज

Image
सेफ्टी ऑफिसर – काळाची गरज लेखक: प्रा. अजय बी. कोंगे विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर आजच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक युगात “सुरक्षा” हा विषय केवळ नियमापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो प्रत्येक उद्योग, संस्था आणि व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रक्रिया, यंत्रसामग्रीचा वाढता वापर आणि धोकादायक रसायनांचा संपर्क यामुळे औद्योगिक क्षेत्रात अपघातांची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत “सेफ्टी ऑफिसर” ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि अपरिहार्य बनली आहे. औद्योगिकीकरण आणि वाढते धोके भारतासह जगभरात औद्योगिकीकरणाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. नवीन कारखाने, उत्पादन यंत्रणा, बांधकाम प्रकल्प, रासायनिक उद्योग, ऊर्जा निर्मिती केंद्रे यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत; परंतु त्याचबरोबर कामगारांच्या सुरक्षेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. अनेक वेळा निष्काळजीपणा, अपुरी माहिती, अपुरे प्रशिक्षण किंवा योग्य सुरक्षा उपाययोजनांचा ...

वर्क परमिट आणि इंडस्ट्रियल सेफ्टी : उपयुक्तता, महत्त्व, काळाची गरज आणि शिक्षणाची आवश्यकता

Image
वर्क परमिट आणि इंडस्ट्रियल सेफ्टी : उपयुक्तता, महत्त्व, काळाची गरज आणि शिक्षणाची आवश्यकता लेखक : प्रा. अजय बी. कोंगे विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस, MSBTE,  संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, जि. कोल्हापूर आजच्या वेगवान औद्योगिक युगात “सुरक्षितता” ही केवळ एक प्रक्रिया नसून ती एक संस्कृती बनली आहे. औद्योगिक प्रगतीच्या शर्यतीत जग पुढे जात असताना, मानवी जीवनाची सुरक्षा, पर्यावरणाचे संरक्षण आणि कार्यक्षेत्रातील शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची अपरिहार्यता बनली आहे. या पार्श्वभूमीवर “वर्क परमिट प्रणाली” (Work Permit System) आणि “इंडस्ट्रियल सेफ्टी” (Industrial Safety) हे दोन महत्त्वाचे घटक प्रत्येक उद्योगाच्या यशस्वी आणि सुरक्षित संचालनासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. वर्क परमिट प्रणाली म्हणजे काय? वर्क परमिट ही एक औपचारिक परवानगी प्रक्रिया आहे, जी कोणतेही धोकादायक किंवा विशेष स्वरूपाचे काम सुरू करण्यापूर्वी घेतली जाते. यामध्ये कामाचे स्वरूप, संभाव्य धोके, आवश्यक सुरक्षा उपाय, जबाबदार व्यक्ती आणि कामाची कालमर्यादा यांचा तपशील दिला जातो. वर्क परमिटचे प...

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

Image
संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात “मला हवं ते मी मिळवतो; परंतु ते माझं एकट्याचं यश नसून माझ्यासोबत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या विश्वास, निष्ठा आणि सुयोग्य नियोजनाचे फलित आहे.” — चेअरमन संजय घोडावत जयसिंगपूर : शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.  संजय घोडावत विद्यापीठ च्या  प्रांगणात तसेच संजय घोडावत समूहाच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच हितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा वर्षाव केल्या. या प्रसंगी सौ. नीता घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, सचिव श्रेणिक घोडावत, सौ.सलोनी घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू  डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, संचालक डॉ. विराट व्ही. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छापर भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर :अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले. स्पर्धांमध्ये ‘इनोव्हाट्रिक्स’, ‘आयडीया पिचिंग स्पर्धा’, ‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’, ‘पोस्टर एक्स प्रो’ आणि ‘टेक रोबस्टा’ या प्रमुख विभागांचा समावेश आहे. ‘इनोव्हाट्रिक्स’ अंतर्गत ‘सर्किट्रिक्स’ आणि ‘इनोव्हेटर्स अरेना...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ उत्सव नसून विद्यार्थ्यांमधील शौर्य, नेतृत्वगुण, स्वाभिमान आणि कर्तृत्व जागवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला, देशभक्तीपर गीतगायन अशा विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन  सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील, प्राध्यापिका भाग्यश्री भालकर यांच्याकडून करण्यात आले आहे. सहभागातून आत्मविश्वास वाढतो, स...

“ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर रहा”लेखक – प्रा. अजय बी. कोंगे

Image
“ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर रहा” लेखक – प्रा. अजय बी. कोंगे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे — स्वतःची किंमत ओळखणे. जगात प्रत्येक वस्तूची, प्रत्येक कलेची, प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी किंमत असते. परंतु ही किंमत सर्वांनाच समजेल असे नाही. म्हणूनच ज्यांना आपले मूल्य कळत नाही, त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात आयुष्य वाया घालवू नये. एका प्रेरणादायी कथेत वडील आपल्या मुलाला एक जुने घड्याळ देतात. ते जवळपास दोनशे वर्षे जुने असते. ते विकण्याचा सल्ला देताना वडील मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याची किंमत विचारायला सांगतात. दागिन्यांच्या दुकानात त्या घड्याळाला फारशी किंमत मिळत नाही; भंगाराच्या दुकानात तर ती किंमत आणखी कमी होते. पण जेव्हा तेच घड्याळ संग्रहालयात नेले जाते, तेव्हा त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य ओळखून लाखो रुपयांची ऑफर मिळते. ही कथा केवळ घड्याळाची नाही; ती आपल्या आयुष्याची आहे. आपण कोणत्या ठिकाणी उभे आहोत, कोणत्या लोकांमध्ये वावरतो, आणि कोण आपल्याकडे कशा नजरेने पाहतो — यावर आपल्या किंमतीचा अंदाज लावला जातो. ...

वंजारी समाज

Image
वंजारी हा समाज लढवय्या आहे.मेहनती आहे.या लोकांनी ऊस तोडून जमिनी विकत घेतल्या आहेत.आणि लेकरांच्या शिक्षणासाठी वेळ पडली तर त्याच जमिनी विकल्या आहेत.आज वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. या समाजाला संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या संतांचे अधिष्ठान लाभले आहे.आणि राजकिय क्षेत्रात गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा नेता लाभलेला होता.आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं ऋण फेडले पाहिजे यासाठी वंजारी समाजाला त्यांनी वेगळं आरक्षण दिलं.सोबतच इतर ओबीसीतील जातींचेही वर्गीकरण केले.ओबीसीतील या अतिमागास जातींना त्यामुळे फी माफी झाली.वंजारी समाजाला मिळालेल्या २% आरक्षणाचा आणि फी माफीचा असा फायदा झाला की वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जाता आलं.आईबाप शेतात कष्ट करून आपल्या मुलाच्या राहण्याखाण्याची सोय होईल इतपत पैसे आपल्या पोटाला चिमटा काढून पाठवू लागले.वंजारी समाजातील होतकरू मुलांनीही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत असो किंवा ज्या क्षेत्रात ते उतरतात तिथे आरक्षणातील कट ऑफ ओपन इतकाच असतो. आणि त्यातले त्यात ओपनमधून मेरीट क...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न अतिग्रे, कोल्हापूर : उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा  अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विभागांतील ३० संघांनी आपापली समस्या निवेदने (प्रॉब्लेम स्टेटमेंट) शॉर्टलिस्ट करून त्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे उत्कृष्ट दर्शन या सादरीकरणांतून घडले. कार्यशाळेची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर एम. अराळी,  सीईओ, के आय टी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, कोल्हापूर  यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीची संकल्पना, समस्या ओळख व त्यावर उपाययोजना, व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, निधी स...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन कोल्हापूर : अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी-ब्लॉक येथील सेमिनार सभागृहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याच दिवशी “इंडिया एआय अभियान”  सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना  कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्ष...