घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन
वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा : ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे: कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची आव्हाने पार करता येतात.उमेद,जिद्द,विश्वास असणारी व्यक्ती कधीच हारत नाही. प्रतिकूल परिस्थितीची झुंज देता यायला हवे तरच आई-वडिलांची इच्छा पूर्ण करता येते असे प्रतिपादन पद्मश्री,सरकारी वकील,ॲड.उज्वल निकम यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठात 26 ऑगस्ट रोजी झालेल्या लाॅ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले,समाजात वकिलांना जंटलमेन म्हणून ओळखले जाते. तो लॉजिकल थिंकिंग करत असतो. चांगलं काय आणि वाईट काय याचं वर्गीकरण करत असतो हे कौशल्य आपल्यात निर्माण होण्यासाठी लॉ चे शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सायबर लॉ,इंडस्ट्री लॉ अशा विशेष शाखांवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. 1991 पासून या भागातील विकासाचा साक्षीदार...