राष्ट्रीय सुरक्षा दिवस
"औद्योगिक सुरक्षा: एक चळवळ" सुरक्षा या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ रक्षण करणे अर्थात काळजी घेणे असा होतो. दैनंदिन जीवनात काम करताना त्यासाठी वापरावयाचा साधनांचा विचार केला जातो ते काम निर्धोक होण्यासाठी जी कार्यपद्धती वापर करायची म्हणजेच सुरक्षा अर्थात सुरक्षितता. सुरक्षा ही बाब मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांसाठी आवश्यक आहे आणि आपणअंगीकार देखील केलेला असतो किंवा कळत नकळत करत असतो जसे आपण ऊन, वारा, पाणी, थंडी इत्यादीपासून सुरक्षित राहण्यासाठी सकस अण्णा बरोबरच वस्त्र निवारा ह्या सुरक्षिततासाठी आपल्याला आवश्यक वाटतात आणि ही बाब पण जन्मापासून पाळत आलेले असतो. औद्योगिक सुरक्षा बाबतचा विचार करताना ही काही वेगळी बाब आहे असे त्याकडे न बघता आपल्या जीवन पद्धतीचा एक भाग आहे या दृष्टीकोनातून त्याकडे बघायला हवे .अर्थात त्याचे खास असे महत्त्व आहे कारण औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रबिंदू आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये कामगाराचा सिंहाचा वाटा आहे.कामगारां शिवाय देशाचे औद्योगिक प्रगती अशक्य आहे. स्वस्थ आणि सुरक्षित कामगार हे देशाला समृद्ध बनवतात.आधुनिक तिकडे वाटचाल करताना सध्याच्या स्पर्धात्मक युगात सुरक्षितता ही मानवी जीवनाचा एक अभिन्न अंग बनली आहे.आपल्याला लाभलेले मानवी जीवन हे परमेश्वराने दिलेली अमुल्य देणगी आहे याचा थोडासुद्धा विसर पडू देऊ नये. आपल्या मनात सुरक्षिततेची भावना जागृत ठेवली तरच सुरक्षा या शब्दाचा आपणास अर्थ पुरेपूर अर्थ कळला आहे असे म्हणता येईल.कारखाना म्हणजे निर्जीव यंत्रांची सजीव माणसाशी सांगड नसून श्रमशक्तीच्या उपासनेचे ते एक मंदिर आहे अशी आपली दृष्टी झाली की कारखान्यांमधून मानवी जीवनाचा सहजीवनाचा सुगंध त्यातून येत असल्याची अनुभूती येते. म्हणूनच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामध्ये आपण माणसांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्रधान्य दिले पाहिजे. कारखान्यातील फक्त कारखान्याचे कामगारच नव्हे तर आत उत्पादन प्रक्रियेत काम करणारी प्रत्येक व्यक्ती सुरक्षित असलीच पाहिजे यावर आपला कटाक्ष असला पाहिजे. कारखान्यात होणारे कोणतेही अपघात मुख्यत्वे सुरक्षा नियमांची पायमल्ली, बेपर्वावृत्ती, अपुरे ज्ञान, निष्काळजीपणा, अर्धवट प्रशिक्षण इत्यादीमुळे होतात असे अभ्यासांती निदर्शनास आलेले आहे.सुरक्षितता ही एक दिवसाची नसून वर्षाचे 365 दिवस, बारा महिने आणि 24 तास अविरत चालणारे चक्र आहे आणि कारखान्यात काम करणार प्रत्येक कामगार सुरक्षित राहावा याकरिता व्यवस्थापनाने हे सुरक्षा चक्र सतत फिरते ठेवले पाहिजे.औद्योगिक सुरक्षेचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी लागणाऱ्या अनेक नानाविध वस्तू उत्पादनासाठी कारखान्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी होते. कारखान्यात वापरली जाणारी यंत्रसामग्री, रसायने, कच्चा पक्का वस्तू पदार्थ व उत्पादन प्रक्रिया मधून निर्माण होणाऱ्या धूर, धूळ, उष्णता, प्रकाश,गरम वाफा, यंत्रांचा होणारा आवाज आदिबाबीमुळे जे वातावरण व परिस्थिती निर्माण होते त्यामुळे त्यात काम करणाऱ्या कामगारांना शारीरिक किंवा त्याच्या व्यवसायिक आरोग्यास बाधा होऊ परिणामी कामगार जाय बंद होऊ शकतो किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते.म्हणूनच कारखान्यांमध्ये कामाच्या ठिकाणी काही खास उपाययोजना करून कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षिततेची तरतूद करणे आवश्यक ठरते. कारखान्यातील अपघात कशामुळे होतात? अपघात ज्या कारणांमुळे किंवा परिस्थितीमुळे घडतात त्याकडे आपण बारकाईने बघितल्यास असे दिसून येईल की त्याची मुख्यता तीन कारणे आहेत ती म्हणजे *'असुरक्षित परिस्थिती'* ज्याला इंग्रजीमध्ये 'अनसेफ कंडिशन' दुसर कारण *असुरक्षित क्रिया* ज्याला 'अनसेफ अॅक्ट'एक म्हणता येईल आणि तिसरे म्हणजे *होताहोता टळलेला अपघात* अर्थात 'नियर मिस' कुठलाही अपघात घेतला तर त्यापैकी एका किंवा दोन्ही किंवा तिन्ही कारणांच्या मिश्रणाचा परिणाम असल्याचे दिसून येईल. असुरक्षित परिस्थिती म्हणजे सर्वसाधारण असुरक्षित व्यवस्था जसे दोषयुक्त यंत्रे , धोकादायक स्थिती निर्माण करण्यास कारण होणारी कारखान्यातील व्यवस्था किंवा प्रक्रिया, स्वयं सुरक्षा साधनांचा अभाव, अपुरी प्रकाश योजना, धूळ, सुरक्षा कुंपण/ जाळी नसलेले अवजड यंत्रे,दोसयुक्त विद्युत रचना, यंत्राचे धोकादायक भागावर सुरक्षा कुंपण नसणे, प्राणवायूचा अभाव इत्यादी.असुरक्षित क्रिया म्हणजे करावयाच्या कामासंबंधी यथायोग्य ज्ञान तसेच कसब याचा अभाव असल्याने, बेप्रवा वृत्तीमुळे सुरक्षित काम होऊ शकत नाही. उदाहरणार्थ सुरक्षिततेसाठी दिलेली स्वयं सुरक्षा साधने न वापरणे, एकाग्रतेचा अभाव,स्वतःबद्दलचा अति आत्मविश्वास किंवा काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा मोह,अति घाई इत्यादी बाबींमुळे असुरक्षित क्रिया होऊन अपघाताला निमंत्रण दिले जाऊ शकते तसेच इतरही काही कारणे म्हणजे स्वतःबद्दलचा आत्मविश्वासाचा अभाव किंवा कामात गोडी न वाटणे दुसऱ्याच्या सुरक्षिततेविषयी किंवा जीवनाबद्दल निराशा जनक दृष्टिकोन ठेवणे अशी आहेत. असुरक्षित स्थिती दूर करता येऊ शकते यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनास जागरूक राहून खास काळजी घेणे आवश्यक ठरते यासाठी कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या यंत्रांच्या धोकादायक भागाला संरक्षक कुंपण अर्थात सुरक्षा गार्ड बसवणे, नियमित यंत्रांची देखभाल दुरुस्ती करून त्यातील दोष वेळोवेळी काढून काढून टाकने, कामाच्या जागेची स्वच्छता तसेच निगा राखणे, कामाची जागा व्यवस्थित ठेवणे, पुरेशा प्रकाशाची सोय करणे, स्वयं सुरक्षा साधनांचा वेळोवेळी पुरवठा करणे. कारखान्यातील सुरक्षितता व आरोग्य वाढीस लागण्यासाठी आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून देणे व ती सहज मिळतील, वापरासाठी योग्य असतील व त्यांचा वापर होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी जनजागृती निर्माण करणे हे व्यवस्थापनाचे काम आहे. कारखान्यातील कामाच्या ठिकाणी धोका निर्माण करणाऱ्या उत्पादन प्रक्रिया बाबतीत असे करा, असे करू नका अर्थात डू अँड डोन्ट तसेच सेप ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करून कारखान्यात दर्शनी भागात लावून तसेच संबंधितांना वेळोवेळी सांगणे याबाबत व्यवस्थापनास आपली जबाबदारी या माध्यमातून पार पाडता येऊ शकते. असुरक्षित क्रिया टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांना आवश्यक प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाची आवश्यकता असते. यात व्यवस्थापनातील अधिकारी, कामगार तसेच त्यांचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे पदाधिकारी या सर्वांचा यात समावेश असायला हवा. ज्यामुळे सर्व संबंधितांना आवश्यक असलेले ज्ञान ,सांघिक प्रयत्न होण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकते. प्रशिक्षणाद्वारे सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्ञानाबरोबरच आवश्यक जण जागृती निर्माण होऊ शकते. अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षण मोहिमेतून सुरक्षिततेविषयी प्रशिक्षण वर्ग, चर्चाशत्र, फिल्म शो, सुरक्षा साधनांच्या वापराविषयी प्रात्यक्षिक, प्रदर्शन भरवणे, सूचना योजना स्पर्धा ठेवणे, पोस्टर्स व सूचना लावणे, अनुभव कथन करणे, निबंध स्पर्धा घेणे, कथाकथन चालता बोलता सारखे कार्यक्रम, पथनाट्य ,एकांकिका या माध्यम पद्धतीचा वापर होऊ शकतो. अशा विविध मार्गांचा अवलंब करून कारखान्यातील सुरक्षितता विषयक वातावरण आणि कामगारांमधली सुरक्षेबाबतची जाणीव जागृती निर्माण करता येईल तसेच कारखान्यात काम करणाऱ्या सर्व थरातील कामगारांचा सहभाग सक्रियरित्या या कार्यास मिळू शकेल. कारखान्यात व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली 'सुरक्षा समिती' स्थापन त्यातून सुरक्षा, व्यवसायजन्य आरोग्य विषयक बाबींची चर्चा,छोटे मोठे झालेले अपघात ची कारणे व करावयाच्या उपायोजनांची, विचारांची देवाणघेवाण करून कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींचा सुरक्षा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग मिळवता येऊ शकेल. या समितीत व्यवस्थापनाचे तसेच कामगारांचे प्रतिनिधित्व असायला हवे व यातून विचारांच्या देवाण-घेवाणीतून अडीअडचणीवर मात करावयास हवी. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य ही बाब मानवी जीवनाशी निगडित आहे. आपले जीवनाचं तत्त्वज्ञान आपणास शिकवते की माणसाने माणसाचे संरक्षण केले पाहिजे. कारखानदारीच्या वाढीबरोबरच त्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेची, व्यवसायजन्य आरोग्याची काळजी घेतली गेल्यास एकूणच उद्योगांचा उद्देश आणि देशाच्या हिताचे आहे. अपघातांमुळे वित्तहानी होते, कामगारास अपंगत्व येते, प्रसंगी जीवित हानी सुद्धा होऊ शकते आणि हे सर्व टाळण आवश्यक आहे. अपघातामुळे काही वेळा आग लागणे, रसायनांची तसेच वायूंची गळती होणे ,स्फोट इत्यादींमुळे राष्ट्रीय संपत्तीची हानी होणे, वित्तहानी होऊन पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे उत्पादनाबरोबरच राष्ट्राचे नुकसान होते. औद्योगिक अपघातांमुळे उद्योगाच्या वाढीवर तसेच कामगारांच्या मनोधर्यावर विपरीत परिणाम होतो. अपघातामुळे अपघातग्रस्त कामगाराचे कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणून अशा या महत्त्वाच्या औद्योगिक घटकाशी संबंधित बाबीसी व्यवस्थापन, कामगार, कामगारांचे प्रतिनिधी, कामगारांच्या संघटना या सर्वांनी मिळून शासनासी सर्व थरांवर सहकार्य करून, सांघिक सहकार्याचे प्रयत्न करून औद्योगिक सुरक्षा व व्यावसायिक आरोग्य याची जाणीव जागृती निर्माण करावी. अधिकाधिक सुरक्षितता, व्यवसायजन्य आरोग्य रक्षक, उद्योग पूरक सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्माण करण्याच्या या राष्ट्र कार्यास सहभागी व्हावयास हवे. सुरक्षिततेविषयी प्रचार प्रसार मोहीम तसेच त्यासंबंधी जनजागृतीसाठी सर्व कारखान्यांनी "राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह" येत्या 4 मार्च ते 11मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात साजरा करावयास हवा. यानिमित्ताने औद्योगिक कारखाना व्यवस्थापन, काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षिततेसंबंधी वचनबद्ध राहण्याच्या दृष्टीने शपथ पूर्वक सुरुवात करता येऊ शकते. सुरक्षेविषयी मागील त्रुटींचा आढावा घेऊन पुढील सुरक्षा विषयक योजनांची दिशा ठरवता येऊ शकते. कारखान्यातून अशा विविध प्रकारे कार्यक्रम करता येऊ शकतात .सुरक्षित सवयींची सुरुवात म्हणून कारखान्यातील स्वच्छता, सुव्यवस्था सुधारण्यासाठी खास मोहीम हाती घेता येऊ शकेल. कारखान्यातील यंत्रसामग्रीची तपासणी करून आवश्यक सुरक्षा साधने बसवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करता येऊ शकेल. कारखान्यात योग्य ठिकाणी पोस्टर्स ,बॅनर्स, भित्तिपत्रके, सुरक्षाविषयक घोषवाक्य लावून याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करता येईल. सुरक्षाविषयक फिल्म कारखान्यात कामगारांना दाखवता येऊ शकेल. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सुरक्षाविषयक विविध स्पर्धा जसे निबंध लेखन, काव्य लेखन, चालता बोलता सेफ्टी पोस्टर्स बॅनर्स बनवणे, सुरक्षा सूचना घोषवाक्य, चालता बोलता सारखे कार्यक्रम, पथनाट्य, एकांकिका सुरक्षा रॅली, रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल इत्यादी आयोजित करता येऊ शकतील. या अशा सर्व कार्यक्रमांना कामगारांची कुटुंबीय देखील सामील करता येऊ शकतील.अशा स्पर्धांच्या माध्यमातून जे कामगार उत्कृष्ट कार्य करतील अशांना प्रमाणपत्रासह बक्षीस देता येतील तसेच अशा सुरक्षा विषयक लिखाण साहित्याची उपलब्धता करून देता येईल व्यवसायजन्य आरोग्य विषयक तपासणी शिबिर भरवता येऊ शकतील, प्रथमोपचार, आग विझवणे व आणीबाणीच्या वेळची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीची प्रशिक्षण वर्ग आयोजित करून औद्योगिक सुरक्षा संस्कृती वाढीस लागण्यासाठी कामगार व त्यांच्या संघटनांचा सक्रिय सहभाग घेऊन औद्योगिक क्षेत्रातील *शून्य अपघात* हे ध्येय गाठणं सहज शक्य होईल.*आपणा सर्वांना ५४ व्या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या व राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा*.जय सुरक्षा . धन्यवाद.आपलाच स्नेहांकित.... श्री राम भागीरथीबाई दिगंबरराव दहिफळे , अपर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई,महाराष्ट्र राज्य.9421588562/8108031503.