स्वतःला तणाव मुक्त ठेवता आलं पाहिजे
स्वतःला तणाव मुक्त ठेवता आलं पाहिजे
सृष्टी वर जर सगळं मिथ्य असेल तर मग चिंता चिंतन आणि तणाव घेण्याची गरज काय आहे मात्र हे कळत नाही म्हणून तणाव निर्माण होतो.कधी कधी दुर्दैवाने हे आपल्याला कळतं मात्र वळत नाही हिच सगळ्यात मोठी समस्या आहे.तणाव मनात साठवला तर त्याचा उद्रेक कधी होईल हे आपल्याला पण समजणार नाही म्हणून तणाव मनात साठवण्या ऐवजी त्याला योग्य वेळी वाट मोकळी करुन देणं कधीही हितकारक ठरत.मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे.शाश्वत जीवनात मोह माया,स्वार्थ मोह,भौतिक आशा अपेक्षा नसतात पण संसारीक भौतिक जीवनात मात्र अनेक आशा अपेक्षा मोह,स्वार्थ,अंहकार असल्याने दैनंदिन जीवनात अनेक ताणतणावाचे प्रसंग निर्माण होतात.आणि याच ताण तणावाचे जीवनात योग्य व्यवस्थपान करण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर मनात रागाचा संचय निर्माण होऊ शकत नाही हे वास्तविक सत्य आहे.सर्व साधारण पणे आपल्याला अधुन मधुन प्रचंड मोठ्या प्रमाणात राग येतो तो अनेकदा अनावर देखील होतं नाही.तो येण स्वभाविक आहे आणि हा प्रचंड राग हा काही क्षणातच एकाएकी अथवा अचानक येत नाही.तर तो अनेक दिवसांपासून आपल्या मनात एक प्रकारचा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने जो तणाव संचय निर्माण झालेला असतो त्याच तो उद्रेक असतो.वास्तविक पाहिलं तर जीवनातील सुख दुःख हे समीकरण असतंच.आणि व्यक्ती कोणीही असो कर्म भोग हे कोणालाही चुकत नाहीत.त्यामुळे जीवनातील सुख दुःख यापासून स्वतः ची सुटका कोणालाही करून घेणं शक्य होतं नाही नाही तरी सुद्धा दैनंदिन अनेक विषयांच्या अनुषंगाने आपल्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक भाव प्रकट होत असतात.ते निर्माण होणं स्वाभाविक आहे.आपण ज्या विचारांना खतपाणी घालतो ते विचार आपल्यावर प्रभाव निर्माण करतात आणि आपण मग आपल्या सोयीनुसार त्याला सुख अथवा दुःख समजतो निर्माण झालेले विचार हे जर नकारात्मक असतील तर आपसुकच नकारात्मक विचारांचे ताण तणावात रूपांतर होणार या मध्ये शंका नाही आणि म्हणून नकारात्मक विचार निर्माण होऊ देयचे नसतील तर आपण आपल्या मनातील तणावाला योग्य वेळी वाट मोकळी करुन देऊन मन मोकळं अथवा रिक्त केलं पाहिजे आणि ते गरजेचं आहे.असं केलं नाही तर मग हाळुहळु निर्माण होणाऱ्या या तणावाचे शेवटी प्रचंड अशा मोठ्या रागात रूपांतर होतं.म्हणजे राग हा कुठल्याही प्रकारचा असो एका क्षणात निर्माण होत नाही हे अगदी धुतल्या तांदळासारख स्वच्छ आणि वास्तव सत्य आहे.एक एक टप्प्याने हळूहळू मनात राग संचाय होऊन तो आपलं स्वरूप विस्तार करत असतो.आणि याच वेळी आपण नेमकं दुर्लक्ष करतो.आणि याचवेळी आपण हि परस्थिती ओळखु शकलो तर मग मात्र आपल खुप मोठा नुकसान होण्या अगोदरच टाळण्यात आपण यशस्वी होतो.तसंच प्रचंड अशा येणाऱ्या मोठ्या रागा पासुन स्वतः ला वाचवु देखील शकतो.रागाच व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे त्या सोबतच आहार हा सात्विक असला पाहिजे, दैनंदिन व्यवस्थित संवाद,वाचन अध्यात्मिक वाचनपण खुप महत्वपूर्ण आहे.तेव्हाच आपण दैनंदिन जीवनात अगदी तणाव मुक्त राहु शकतो.म्हणजे जीवनात येणारा प्रचंड राग आणि त्यामुळे होणार आपलं प्रचंड नुकसान थांबु शकत.व त्याचे आपल्या जीवनावरील विपरीत परिणामही आपण कुठं तरी नियंत्रित करू शकतो.म्हणून तणाव मुक्ति हि खूप आवश्यक आहे.आणि आपण ती नक्कीच करू शकतो त्यासाठी आपण कितीही व्यस्त असलो तरी दिवसभरात स्वतःच्या शरिरासाठी साधारणतः एका तसाचा वेळ आपण दिला पाहिजे.जेणेकरून निर्माण झालेला थोडा तणाव त्याच दिवशी संपुष्टात येईल.तसेच संवाद म्हणजे एक आठवड्यात एकदा तरी मनमोकळेपणाने संवाद झाला पाहिजे जेणेकरून मानसिक स्थैर्य देखिल मिळेल व मन स्थिर शांत होईल.महणून संवाद देखिल खुप महत्वाचा आहे.मन तणाव मुक्त होईल असा संवाद देखिल झालाच पाहिजे.संवाद हे तणाव मुक्ति चे अगदी सुयोग्य साधन आहे.या साधनाचा योग्य लाभ आपल्याला घेता आला पाहिजे.आपण ज्या व्यक्तिशी संवाद साधल्या नंतर आपल्या मनाला हलकं वाटत बरं वाटत मन शांती मिळते.आशा व्यक्तिला अंहकार बाजुला ठेवून आवश्यकतेनुसार वैचारिक संवाद साधला पाहिजे.असे शब्द आपल्या कानावर पडताच क्षणी आपण तणावमुक्त झाल्यासारखे आपल्यला वाटत असतं.आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव त्याचे रागात होणार रुपांतर होण्या ऐवजी तो जगीच संपुष्टात येतो.दैनंदिन जीवनात वाचन मग ते काही पण वाचा मात्र वाचन आवश्यक आहे.वाचलं तर वाचाल हे उगीच म्हटलं नाही आणि त्यामध्ये हि अध्यात्मिक वाचन केले तर आति उत्तम आहे.आणि या पद्धतीने आपण आपल्या जीवनात निर्माण होणारा शारिरिक मानसिक तणाव कमी करू शकतो.आणि पर्यायाने त्याचे रागात होणार रुपांतर आपण नक्कीच थांबवु शकतो.स्वतःचा बचाव करून आपण आपलं मोठं नुकसान देखील टाळु शकतो.आणि एक ज्ञान पुर्ण शांत स्थिर जीवन आपण जगु शकतो .
*गणेश खाडे*
*विचारवंत,साहित्यिक, लेखक,आध्यत्मिक मार्गदर्शक,तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ* 9011634301