Posts

घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Image
योग्य उद्देशानेच यशाचा मार्ग मिळतो: प्रो.उद्धव भोसले  घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत अतिग्रे:विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना योग्य उद्देश ठेवणे गरजेचे आहे. ज्या उद्देशाने आपण शिक्षण घेतो तो उद्देशच आपल्याला यशाकडे घेऊन जातो, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.उद्धव भोसले यांनी केले. ते विद्यापीठातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभावेळी बोलत होते.         यावेळी त्यांनी विद्यापीठातील अभ्यासक्रमाविषयी, संशोधन  क्षेत्रातील प्रगती विषयी माहिती दिली. विद्यापीठातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंबद्दल सांगितले. परदेशी विद्यापीठ व उद्योग क्षेत्राशी घोडावत विद्यापीठाने सामंजस्य करार केले आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20-20 नुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आल्याचे सांगताना विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.       य...

गुरुपौर्णिमा "आजच्या काळामध्ये मेंटोर आणि मेंट्टी"

Image
                गुरुपौर्णिमा आजच्या काळामध्ये मेंटोर आणि मेंट्टी "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुदेवाय नमः" आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुंची भूमिका महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत आपल्याला घडवण्यात योगदान दिलेल्या गुरुंप्रती कृतज्ञतेची भावना जपली पाहिजे, असा विश्वास आहे. आणि तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हिंदू परंपरेनुसार आषाढातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हा सण साधारणपणे जून किंवा जुलै महिन्यात येतो. यावर्षी तो २१ जुलैला म्हणजेच रविवारी  आहे. हिंदू धर्मामध्ये गुरूना सर्वश्रेष्ठ दर्जा आहे. पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा महाभारताचे लेखक वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यांच्या सन्मानार्थ या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेद व्यास यांनी चार वेदांची रचना केली होती म्हणून त्यांना वेद व्यास असे नाव देण्यात आले आहे, असेही धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. भारतात प्राचीन...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या  मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक १८ जुलै २०२४ दुपारी ३.०० वाजता संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘सी ब्लॉक’ सेमिनार हॉल मध्ये करण्यात आलेले आहे. अशी माहिती प्रसार माध्यमास प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी दिली आहे. डॉ. सुहास देशमुख हे संशोधन आणि व्यावहारिक प्रकल्पांद्वारे शिक्षण, आजपर्यंत त्यांच्या गटाने मशीन हेल्थ मॉनिटरिंगसाठी इन-सर्व्हिस इन्फॉर्मेशन सिस्टम, सेन्सर-लेस प्रिसिजन स्कॅनिंग मशीन, चुंबकीय इंधन कंडिशनर्स, लिनियर कंप्रेसर, मायक्रो-स्टिरिओलिथोग्राफी यासारखे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. डिझाईन, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन आणि एनर्जी ऑडिटिंग आणि विश्लेषण सल्लागार म्हणून डिझाईन सेंटर, इमर्सन टेक्नॉल...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन”

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने विविध  मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन”  कोल्हापूर : 'जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त' विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्ग केंद्र व राज्य शासन योजनातील प्रशिक्षण, कोर्सेस, कार्यशाळा, जाणीवजागृती, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ जुलै २०२४ ते २० जुलै २४ संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग येथे  करण्यात आले आहे. जागतिक युवा कौशल्य दिन २०२४ ची थीम "शांतता निर्माण, संघर्ष निराकरण आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांमध्ये तरुण कसे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात"  या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांना कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. अजय बी. कोंगे हे मार्गदर्शन करणार आहेत.    या मार्गदर्शन कार्यक्रमा मध्ये जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत मोफत आणि   विद्यावेतनासह तांत्रिक अभ्यसक्रम (कोर्सेस) सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर,  फौंड्री टेक्नॉलॉजी, लेथ मसि...

एनपीटीईएल कडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार4 विद्यार्थ्यांना सुवर्ण तर 2 विद्यार्थी टॉपर

Image
एनपीटीईएल कडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार 4 विद्यार्थ्यांना सुवर्ण तर 2 विद्यार्थी टॉपर अतिग्रे:  आयआयटी बॉम्बे इथे 29 जून रोजी एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग) यांचे कडून संजय घोडावत विद्यापीठाला यावर्षीचा  'अस्पिरंट ऍक्टिव्ह स्वयंम् एनपीटीईएल लोकल चाप्टर' पुरस्कार आयआयटी मद्रासचे प्रोफेसर अँड्रू थंगराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.समन्वयक प्रा. निलेश सबनीस यांनी तो स्वीकारला. यावेळी भारती बालाजी हेड ऑपरेशन आयआयटी मद्रास, प्रो.नंदिता माधवन आयआयटी बॉम्बे उपस्थित होत्या.        घोडावत विद्यापीठात  2016 पासून स्थानिक पातळीवर एनपीटीईएल स्वयंम् पोर्टलद्वारे चालवण्यात येणारे ऑनलाइन शैक्षणिक प्रमाणपत्र कोर्सेस सुरू आहेत. यावर्षी 400 शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. यातील यश खाडे, पिनाज शेख, शशिकांत उपाध्ये, प्रथमेश खेडकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तर आदिती क्षीरसागर, मनोज मंगोरे टॉपर आले. क्रियाशील स्थानिक विभाग म्हणून दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठ एनपीटीईएल च्या यादीमध्ये ...

धर्मदाय हॉस्पिटल

पुण्यात रहाणारे आणि बाहेरून येणारे उपचारासाठी जाण्याआधी हे अवश्य वाचा . काॅपी करून योग्य ठिकाणी ठेवा . *पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा  या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.* *याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी  वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, मुख्यमंत्र्यांना व धर्मादाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या  प्रयत्नाला यश आले आहे, याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे, उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासू...

स्वकर्तृत्व...

मित्रांनो, आपला पाहण्यात असे कितीतरी लोक असतात ते ज्या लोकांना लोक किंमत देत नसतात. कामापुरते त्यांचा वापर करून घेत असतात. अशा लोकांनी स्वतःला बदलण्याची खूप गरज असते. तरच त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळेल. म्हणूनच स्वतःला इतकं बदला की लोक पाहतच राहतील. यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. १) नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही. २) तुम्ही तुमच आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्यांचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्व विसरून जातो. त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते. ३) ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाही. ४) ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीही जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची मुळीच इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्व कमी करून घेऊ नका. ५) त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही...