स्वतःला तणाव मुक्त ठेवता आलं पाहिजे
स्वतःला तणाव मुक्त ठेवता आलं पाहिजे सृष्टी वर जर सगळं मिथ्य असेल तर मग चिंता चिंतन आणि तणाव घेण्याची गरज काय आहे मात्र हे कळत नाही म्हणून तणाव निर्माण होतो.कधी कधी दुर्दैवाने हे आपल्याला कळतं मात्र वळत नाही हिच सगळ्यात मोठी समस्या आहे.तणाव मनात साठवला तर त्याचा उद्रेक कधी होईल हे आपल्याला पण समजणार नाही म्हणून तणाव मनात साठवण्या ऐवजी त्याला योग्य वेळी वाट मोकळी करुन देणं कधीही हितकारक ठरत.मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे.शाश्वत जीवनात मोह माया,स्वार्थ मोह,भौतिक आशा अपेक्षा नसतात पण संसारीक भौतिक जीवनात मात्र अनेक आशा अपेक्षा मोह,स्वार्थ,अंहकार असल्याने दैनंदिन जीवनात अनेक ताणतणावाचे प्रसंग निर्माण होतात.आणि याच ताण तणावाचे जीवनात योग्य व्यवस्थपान करण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर मनात रागाचा संचय निर्माण होऊ शकत नाही हे वास्तविक सत्य आहे.सर्व साधारण पणे आपल्याला अधुन मधुन प्रचंड मोठ्या प्रमाणात राग येतो तो अनेकदा अनावर देखील होतं नाही.तो येण स्वभाविक आहे आणि हा प्रचंड राग हा काही क्षणातच एकाएकी अथवा अचानक येत नाही.तर तो अनेक दिवसांपासून आपल्या मनात एक प्रकारचा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगान...