संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत "स्वच्छ भारत अभियान" श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन
संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत "स्वच्छ भारत अभियान" श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन
जयसिंगपूर : देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. ०१ तास 'स्वच्छ भारतचा एक भाग म्हणून श्रमदान' या स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. "स्वच्छतेच्या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आयएसआर सेल अंतर्गत अतिग्रे गावातील या उपक्रमासाठी सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थी, शिक्षक, सर्व मंडळाचे पदाधिकारी, सेवाभावी संस्था, समाजसेवक, पत्रकार, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, ग्रामस्थ या सर्वांना मास आणि हॅन्ड ग्लोज गावचे सरपंच श्री. सुशांत वड्ड यांच्या हस्ते वितरित करून 'स्वच्छता अभियान' "श्रमदान" कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुशांत वड्ड, उपसरपंच सौ छाया उत्तम पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संजय घोडावत इन्स्टिट्यूट मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. पी एम पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, प्रा. विशाल तेली, सौरभ फडतरे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. ऋषी बेचारा तसेच वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी, विद्या मंदिर अतिग्रे शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत गावातील वेगवेगळ्या भागातील स्वच्छता करण्यात आली.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी स्वच्छ भारत अभियान उपक्रमास शुभेच्छा दिल्या.