Posts

Image
कौशल्याचा उपयोग करून स्टार्टअप सूर करा : प्रा.ए. बी. कोंगे कोल्हापूर: महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करून नवीन स्टार्टअप सुरू करावे असे प्रतिपादन संजय घोडावत पॉलीटेक्निकचे कौशल्य व उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा.अजय बी कोंगे  यांनी केले. श्री. अण्णासाहेब डांगे आर्टस्, कॉमर्स, अँड सायन्स कॉलेज हातकणंगले येथे राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिना निमित्ताने भारतात स्टार्ट-अप साठी संधी आणि आव्हाने या नॅशनल सेमिनार मध्ये स्टार्टअप इंडिया अंतर्गत धोरण आणि उपक्रम विषयातील  व्याख्यानात प्रा. कोंगे  बोलत होते.   अध्यक्षस्थानी मा. श्री छगनराव. नांगरे संचालक, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर,  प्राचार्य डॉ. योजना जुगळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अशोकराव जाधव, डॉ. वंदना खरात, विजय डोंगरे, अब्दुल सरकवास  आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. कोंगे पुढे म्हणाले, विदयार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याची क्षमता विकसित करायला ह...

दैनंदिन जीवन शैली

 *१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र* *१) वात २) पित्त ३) कफ* वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *निरोगी* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात       *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?  *त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल* १) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.* २) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात) ३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा. ४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन) दंत रोग दूर राहतात ५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे...

मा. बबनराव ढाकणे साहेब

Image
 मा. बबनराव ढाकणे साहेब, माझी केंद्रीय ऊर्जा मंत्री,   भारत सरकार यांची आज भेट घेऊन आशीर्वाद घेतले आणि साहेबांन सोबत विविध विषयावर सखोल चर्चा झाली. पाथर्डी तालुक्‍याच्या आणि अहदनगर जिल्हा विकासात माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे साहेब  यांचा मोलाचा वाटा आहे. ढाकणे साहेब यांनी आजपर्यंत चार वेळा आमदार, एक वेळा खासदारपद भूषविले. विधानसभेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी आपल्या भाषणबाजीची चुणूक दाखवून दिली. दुग्धविकास व ग्रामीण विकासमंत्री, बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगली गाजली. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष भूषविले. गोवा मुक्ती संग्रामातील जिल्ह्यातील पहिले सत्याग्रही म्हणून ते ओळखले जातात. आंदोलने व सत्याग्रहाबद्दल त्यांना 32 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना, पाथर्डी तालुका कापूस जिनिंग प्रेसिंग सोसायटी, एकलव्य शिक्षण संस्था आदी संस्थांची ढाकणे साहेब  यांनी स्थापना केली आहे.

प्रा. ए. बी. कोंगे

Image
प्रा. अजय बबनराव  कोंगे यांचे  शिक्षण - एम. ए. एम. एड. पुणे विद्यापीठ येथे झालेले  आसून त्यांनी  अध्यापक विद्यालयात प्राध्यापक पदावर 14 वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले आहे. जिल्हा समन्वयक अधिकारी कौशल्य विकास  या पदाच्या कामाचा  उत्तम अनुभव त्यांना आहे. प्रा. ए. बी. कोंगे हे  केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास लोकोपयोगी योजनांचे संजय घोडावत विद्यापीठ स्तरावर सेंटर समन्वयक , संजय घोडावत पॉलिटेक्निक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, प्रमुख समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.  त्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना , महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना विविध केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी कौशल्य भारत कौशल्य  विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण  कोर्सेसचे शासकीय योजनातून मोफत  विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.          महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान ,  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,  दीन दयाळ उपाध्याय...

नवीन उद्योग उभारणीसाठी शासकीय योजना

 *शासकीय योजना (प्रकल्प)* 2021-2022              *1) गाई-म्हशी विकत घेणे :-*  प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस .सी./एस .टी .साठी )  *2) शेळीपालन :-*  प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड  (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस .टी.) *3) कुक्कुटपालन :-*  प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी  (शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस. टी.)  *4) शेडनेट हाऊस :-* प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे  (शासकीय योजना - ५० % ) *5) पॉलीहाउस :-*  प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे  (शासकीय योजना - ५० % ) *6) मिनी डाळ मिल :-*   प्रकल्प खर्च -१.८८ लाख    (शासकीय योजना - ५० % )  *7) मिनी ओईल मिल :-*   प्रकल्प खर्च -५ लाख  (शासकीय योजना - ५० % )  *8) पॅकिंग व ग्रेडिंग सेटर :-* ३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी. *9) ट्रॅक्टर व अवजारे :-*  प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये ...

Award 2021 प्रा.अजय कोंगे यांना ''राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार'' प्रदान

Image
  प्रा.अजय कोंगे यांना ''राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार'' प्रदान संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्याकडून ''राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार'' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याबद्दल विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. हा पुरस्कार म्हणजे संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या यशस्वी वाटचालीतील शिरपेचात मानाचा तुरा म्हणावा लागेल. प्रा.अजय कोंगे यांनी  शैक्षणिक, सामाजिक, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  प्रा.कोंगे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी गावचे असून सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे मग ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे, गरजूला,समाजातील उपेक्षित घटकांना मदत, इत्यादी विविध कामे त्यांच्या सामाजिक कार्याचा संदेश देतात. त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास ...

RTI@2005

 RTI@2005 केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ : सामान्य माणसांचा अधिकार              माहितीचा अधिकार RTI @ 2005  न्यायालये , संसद , विधीमंडळ , महामंडळे जिल्हाधिकारी कार्यालय , न्यायालये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका , शासनाचा अर्थिक लाभ घेणाऱ्या सहकारी किंवा सेवाभावी संस्था , मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयाच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू केला आहे . विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून व तसा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून , अशा अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरीता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यासाठी माहिताचा अधिकार अधिनियम २००५ करण्यात आला आहे . माहिती मिळविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना ती पुरविण्याकरिता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली . माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुस...