शिक्षण आणि उद्योग
शिक्षण आणि उद्योग
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्यूनर घेतल्यापासून आपण करत असलेल्या नोकरीचा आणि आपण घेतलेल्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही असं सांगणारे खूप सारे रिल्स येत आहेत.. पण इथे विषय शिक्षणाचा नाही..
एखाद्याने केलेली कमाई ही डायरेक्ट शिक्षणाशी जोडणं किंवा नोकरी जोडणे चुकीचा आहे.. कसं ते सांगतो..
१.पहिला मुद्दा आहे व्यवसाय vs नोकरी
व्यवसाय भलेही मग तो रस्त्याच्या कडेला टाकलेल्या हॉटेलचा असो पण या ठिकाणी होणारा प्रॉफिट हा डायरेक्ट मालकाचा असतो.. याच्या अगदी विरोधात नोकरी करणाऱ्याला महिन्याला फिक्स पगार मिळतो आणि कंपनीतून होणाऱ्या नफ्यातील मिळालाच तर फक्त बोनस मिळतो तेही वर्षातून एकदाच..
२. दुसरा मुद्दा आहे स्केल आणि डिमांडचा
महाराष्ट्र असो किंवा इतर कुठेही जर का उत्तम दर्जाच खायला मिळत असेल तर या ठिकाणी गर्दी होणार, डेली कॅश फ्लो हा असणारच.. त्यामुळे नोकरी करणारा माणूस इथे स्पर्धेत कुठेच बसत नाही..
३. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे रिस्क आणि रिवॉर्ड
कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, भांडवल मोठ लागतं, माणसं सांभाळावे लागतात तेव्हा कुठे जाऊन डायरेक्ट फायदा होतो.
नोकरी करणाऱ्याला आर्थिक धोका नको असतो त्याच्यामुळे आहे त्या फिक्स मासिक उत्पन्नामध्ये ऍडजस्ट कराव लागतं..
४. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संधी आणि माइंडसेटचा. एखादा व्यक्ती शिक्षणाने कमी असू शकतो पण त्याच्याकडे व्यवसाय करण्याचं स्किल हे निश्चितपणे असू शकतं.
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला त्याचं प्रॉडक्ट उत्तम प्रतीने विकता येते, ते एक नॅचरल मार्केटर आहेत.. इनफॅक्ट आज हॉटेल बंद आहे याचं सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलेलं आहे.. आणि त्याचे सुद्धा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले..
याच्या दुसऱ्या बाजूला नोकरी करणारा शिक्षित नोकरदार याला निश्चित अशी नोकरीची हमी हवी असते.. आणि हीच हमी त्याचं उत्पन्न किती मिळवू शकतो हे पोटेन्शिअल दाबून ठेवते..
त्यामुळे पूर्णपणे शिक्षणाला दोष देण्यामध्ये किंवा आपल्या नोकरीला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही..
शिक्षण हे एक टूल आहे जे तुम्हाला स्किल, अवेअरनेस आणि नॉलेज देत.. याचा वापर संपत्ती निर्माण करण्यात कसा करायचा हे तुमच्या धोका पत्करण्यावरती, तुम्ही संधी कशी हेरता याच्यावरती आणि तुमच्या माईंडसेट वरती अवलंबून असतं..
त्यामुळे शिक्षणाला आणि नोकरीला उगाच दोष देऊ नका.. असेल हिम्मत तर तुम्ही सुद्धा धोका पत्करून व्यवसाय करायला हरकत नाही.. त्यांचं मनमोकळेपणाने अभिनंदन करा.. त्यांच्याकडून आपल्याला शिकायला खूपकाही आहे..
गमवायला काही नसेल तर कमवायला खूप काही आहे हे लक्षात घ्या..
© अरुणराज जाधव ( बोल भिडू )