Posts

माहितीचा अधिकार कायदा @2005

माहितीचा अधिकार कायदा @2005 निष्प्रभ झालेला कायदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर' घटना समितीने प्रदीर्घ विचारांती भारतात लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्थापन करण्याचा १९५० साली निर्णय घेतला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजा ही राजा. आणि मग शासनात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच हुद्दा प्रदान करण्यात आला, तो म्हणजे शासकीय सेवक. म्हणजे प्रजारूपी राजाचे सेवक! दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गेल्या ७५ वर्षात शासनात काम करणारे सेवक झाले राजे आणि प्रजासत्ताकातील राजा म्हणवणारी प्रजा झाली सेवक अशी परिस्थिती निर्माण झाली. १९२३ चा ब्रिटिशांनी आणलेला शासकीय गोपनीयता कायदा रद्द झालाच नाही. किंबहुना, त्याचा ब्रिटिशांपेक्षा जास्त प्रभावी वापर करून शासकीय सेवक प्रजारूपी मालकापासून माहिती दडवू लागले. १९७५ पासून सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ हा नागरिकांचा घटनादत्त मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करत ‘माहिती अधिकार कायदा’ तातडीने तयार करण्याच्या सूचना सरकारला केल्या. अरुणा रॉय यांच्यापासून अण्णा हजारे यांच्यापर्यंत असंख्य सामाजिक कार्यकर...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे  राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय  यश "ईअँडटीसी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” ने जिंकले कॅनसॅट चॅलेंजमधील राष्ट्रीय विजेतेपद! कोल्हापूर (प्रतिनिधी): त्रिवेंद्रम (केरळ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेंशिया २०२५ ही भव्य राष्ट्रीयस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट (एसजीआय)* च्या ई अँड टी सी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तेरा नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी पुणे), एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे आणि व्हीआयटी चेन्नई यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता. या कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परिक्षेत एसजीआयचा संघ एकमेव असा ठरला, ज्...

"शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे,"

Image
“शिस्त, शिक्षण आणि समाज – एक नवा विचार” "शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे," ✍️ लेखक : प्रा. अजय बी. कोंगे (शिक्षण, मानसशास्त्रीय समुपदेशक) प्रस्तावना “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः” असे आपले शतकानुशतकांचे तत्त्वज्ञान आहे. गुरू म्हणजेच शिस्त, ज्ञान, मूल्ये आणि संस्कारांचे मूर्तिमंत प्रतीक. परंतु, आजच्या समाजात हीच शिस्त, हेच संस्कार आणि हा आदर हरवत चाललेला दिसतो. शाळेत शिक्षकांनी मुलाला फटकारले किंवा शिस्त लावली तर पालकांच्या मनात लगेच नाराजी उमटते. पण त्याच मुलाने पुढे चुकीचे वर्तन केले तर समाज, पोलिस आणि न्यायव्यवस्था त्याला जाब विचारतात. आजची खरी शोकांतिका अशी आहे की – 👉 शिस्त हरवली, 👉 शिक्षणाचे मूल्य कमी झाले, 👉 पालकांचे नियंत्रण ढासळले, 👉 आणि समाज स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढू लागला. ही परिस्थिती बदलायची असेल तर पालक, शिक्षक, समाज आणि प्रशासन या सर्वांनी आपली भू...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) माहिती आणि मार्गदर्शक मार्गदर्शक : प्रा. अजय बी. कोंगे प्रस्तावना आजच्या युगात तरुणाई ही समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. रोजगार ही फक्त आर्थिक सुरक्षिततेची बाब नाही, तर आत्मसन्मान, स्वावलंबन आणि सामाजिक प्रतिष्ठा याचाही आधार आहे. पारंपरिक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांना उद्योजकतेकडे वळविणे ही काळाची गरज आहे. याच गरजेचा वेध घेत महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाच्या भक्कम सहकार्याने, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविला आहे. ही योजना म्हणजे तरुणाईच्या हाताला कौशल्य व संधी मिळवून देणारे सुवर्णद्वार आहे. १ लाख ते ५० लाखांपर्यंत प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान व बँक कर्जाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची दिशा या योजनेतून दिसते. योजनेविषयी थोडेसे हितगुज महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा तर्फे राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा उद्देश फक्त रोजगार निर्माण करणे नाही, तर नवीन उद्योजक तयार करणे आहे. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नवे उद्योग उभारून इतरांसाठी रोजगार उपलब्ध क...

एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.

Image
एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल. कोल्हापूर : मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात  अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मुंबई येथे संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी स्वीकारला.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शशिकांत विश्वकर्मा, आय. बी स्कुल, डेव्हलपमेंट असोसिएट मॅनेजर भारत, श्री. सुरेन रामसुब्बू, संचालक अकॅडमिक इंटरनॅशनल स्टडीस, व अनिल शर्मा फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर एज्युकेशन टुडे हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या शाळांना 'एज्युकेशन टुडे ' या संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात आले.  महाराष्ट्रातील नंबर वन वन डे कम बोर्डिंग विभागातील स्कूलचा मानाचा किताब संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने मिळवला आहे.  पुरस्काराच्या निमित्ताने विश्वस्त विनायक भोसले यांनी  सं...

कोणत्या ही कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन

कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन ✍️ लेखक – प्रा. अजय बबनराव कोंगे प्रस्तावना मानवी जीवन म्हणजे कार्यांची अखंड मालिका. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही कामे, जबाबदाऱ्या व संधी घेऊन येतो. कोणत्याही कार्यात यश मिळवायचे असेल, तर त्याची योग्य सुरुवात करणे हे पहिले पाऊल असते. सुरुवातच जर ठोस, नियोजनबद्ध आणि उत्साहवर्धक केली, तर पुढचा संपूर्ण प्रवास सुलभ होतो. मात्र आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण सुरुवातीच्या टप्प्यातच कारणे शोधतात – वेळ नाही, मनस्थिती योग्य नाही, साधनसामग्री अपुरी आहे, मार्गदर्शन मिळाले नाही, इत्यादी. अशा कारणांमुळे कामाला उशीर होतो, गोंधळ वाढतो आणि अखेरीस यश मिळण्यात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच, "कामाची चांगली सुरुवात" हा विषय केवळ कामकाजापुरता मर्यादित नसून जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होतो – शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैयक्तिक विकास, कुटुंब व्यवस्थापन किंवा सामाजिक कार्य. या लेखात आपण कामाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची जाणीव ठेवावी, कोणती पद्धत वापरावी, कोणते टप्पे पार पाडावेत आणि त्या मागील मानसशास्त्र काय आहे हे विस्तृतपणे पाहू. १...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट  अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न. कोल्हापूर : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी अभियांत्रिकी व शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम” संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त,  विनायक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष पदवी विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी महाडिक, शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, सर्व विभागाचे  विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्य...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात "सामंजस्य करार" संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात  "सामंजस्य करार" संपन्न कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) विषयक सामंजस्य करार  आज यशस्वीरित्या संपन्न झाला. या करारानिमित्त आयोजित तज्ञांनी सत्रात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याचे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले. डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांनी 'नवीन कल्पनेत नाविन्य आहे की नाही, हे कसे ओळखावे' याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नवकल्पनांचे मूल्यमापन, संरक्षणाच्या पद्धतींवर तपशीलवार मार्गदर्शन केले.   या प्रसंगी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आयपीआर" मुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना संरक्षण मिळते. संशोधन, प्रकल्प व स्टार्टअप संस्कृतीला यामुळे चालना मिळते.” या करारामुळे संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण संशोधन, प्रकल्प विकास व बौद्धिक संपदा अधिकार विषयक मार्गदर्शन मिळणार असून उद्योग-शिक्षण...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन  कोल्हापूर, अतिग्रे : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे एआयसीटीई व डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने   "शिक्षण आणि संशोधनात एआय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे"   या विषयावर आधारित   सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम   आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम   १ ते ६ सप्टेंबर २०२५   या कालावधीत आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स    विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन व संशोधनातील वापर, तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून एआयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात एआयची ओळख,  स्मार्ट टीचिंगसाठी एआय टूल्स, वैयक्तिक व सर्वसमावेशक शिक्षणासाठी एआय,  संशोधनातील एआयचा वापर,  नैतिकता, पक्षपात...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपण  न्यूज18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती  चौकटीत : पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था  "संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे कोल्हापूर" असे गौरवोद्गार विलास बडे यांनी काढले कोल्हापूर  – संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन  कॅम्पस मध्ये वृक्षारोपण व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज18 लोकमतचे सीनियर वरिष्ठ वृत्तनिवेदक  विलास बडे, सिंजेंटा इंडिया प्रा.लि. संचालक डॉ. माधवानंद काशीद, कंट्री लीड प्रा.लि चे संचालक श्रीधर लाढाणे, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम एस काळे, प्रा. सौ. एन एस सासणे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार...