Posts

घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी अंतर्गत शालेय साहित्यांचे वाटप...

Image
  घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी अंतर्गत शालेय साहित्यांचे वाटप जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी या सामाजिक उपक्रमांतर्गत आष्टा जि. प. शाळा नं.०९ वाळवा, सांगली प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असण्याऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी वाळवा श्रीमती. मंगल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मनिषा मोटकट्टे, शा.व्य. सदस्य श्री. राजाराम देसावळे, मॉडेल स्कुल कमिटी सदस्य श्री. साजिद आयुबखान इनामदार, वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. फरिदा रमजान मकानदार, सहशिक्षक श्री. दयानंद बाळासाहेब लोखंडे, श्री. समीर इसाक नायकवडी, उपशिक्षका सौ. निलम जगदिश साळुंखे, श्रीमती. शाहीन मुजावर, पालक, गावातील ग्रामस्थ आणि संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजन्य वारी आली आपल्या दारी कार्यक्रम समानव्यक प्रा. अजय कोंगे, श्री. आशिष कुलकर्णी, श्री.सचिन देसाई, पूनम शिंदे, एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक, प्रा. अजय कोंगे यांनी उपस्थितांना या कार्यक्रमाविषयी...
Image
  शिरसाटवाडी अष्टभैरवनाथ यात्रा-उत्सव...    पाथर्डी  |  शिरसाटवाडी     :  पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील अष्ट भैरवनाथाच्या   यात्रेस (हनुमान उस्तव ) पासून प्रारंभ होत आहे.   यात्रा 3 दिवस असते. यात्रेसाठी विविध जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेर नोकरी, उद्योग - व्यवसायासाठी  गेलेले सर्व भाविक “चैत्र पौराणिमा हनुमान उत्सव” अष्ट भैरवनाथाच्या दर्शनास   शिरसाटवाडी येथे येतात.  आधल्या दिवसी सायंकाळी  ५  वा.   पाथर्डी मध्ये  श्री. क्षेत्र पैठण येथून पायी चालत आलेल्या कावडींची पूजा करून    भव्य मिरवणूक काढली जाते.  चैत्र पौराणिमाच्या दिवसी  सकाळी ९  वा. शिरसाटवाडी गावामध्ये कावडींची पारम  परीक वाद्य वाजवून मिरवणूक गावातून फिरवली जाते  ११ वा. अष्ट भैरवनाथांना जलअभिषेक घातला जातो. गावातील वरिष्ठ नागरिक पेढा नारळाची कावडी धारकांना शेरनी वाटप करतात.  तर काही कुठंब कावडी धारकांना गोड-धड जेवण देतात.  रात्री ९ वा.   अष्ट भैरवनाथाच्या  छबिण...
Image
 . संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये  "जागतिक महिला दिन"  मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न... Prof. Ajay B. konge @Blogger 08 March 23 :   संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे  कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करून महिलां आणि  विद्यार्थीनी साठी मार्गदर्शन पर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महिला दिन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  सौ. राणी बाळासाहेब पाटील ह्या उपस्थित  होत्या.  कार्यक्रमाचे उद्घाटन   प्राचार्य,  विराट गिरी  यांच्या हस्ते झाले.  मार्गदर्शन करताना  प्रा. गिरी यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलानी  कोणकोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.   त्यांच्या कार्यास उजाळा देऊन प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे आपण स्वतः आत्मनिर्भर होऊन देशाचा सर्वांगीण विकास होईल. या उद्देशाने कार्य करीत राहिले पाहिजे. प्राचार्य गिरी यांनी लता करे  या महिलेचे  उदाहरण  देऊन  उपस्थित  महिला विद्यार्थिनीना महिलांच्या कार्याविषयी  मार्गदर्शन...

आज जागतिक भूगोल दिन !

🌍 *🌍 १४ जानेवारी 🌍* *जागतिक भूगोल दिन* ******************************** आज जागतिक भूगोल दिन ! भूगोल महर्षी प्रा. चं. धुं. (सी.डी.) देशपांडे यांचा जन्मदिन हा 'भूगोल दिन' म्हणून पाळण्यात येतो. संपूर्ण जगामध्ये एखाद्या विषयाकडे खास लक्ष वेधून घेण्यासाठी त्या संबंधीचा ‘विशेष दिन’ साजरा करण्याकडे वाढती प्रवृत्ती दिसून येते. राज्यात १४ जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा होऊ लागला त्याला या वर्षी ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. शिक्षण क्षेत्रात व महाराष्ट्रात शालेय पातळीवर मोठय़ा उत्साहाने हा दिवस साजरा करतात. भूगोल महर्षी प्रा. चं.धुं. (सी.डी.) देशपांडे हे भूगोल या विषयाचे प्राध्यापक, महाराष्ट्राचे शिक्षण संचालक व दिल्ली पर्यंत नव्हे तर परदेशातही नावाजलेले भूगोलतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना भूगोलात आवश्यक असणारी मानव पर्यावरण सहसंबंधांबाबत सम्यक दृष्टी दिली. म्हणून त्यांच्या स्मृतीखातर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या ७५व्या जन्मदिनी असे ठरविले की, भूगोल या अतिशय महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ म्हणू...

मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार १ लाख रुपये कर्ज

Image
  मुद्रा लोन योजनेद्वारे  मिळणार १ लाख रुपये कर्ज       आपला व्यवसाय वाढवा, तुम्हाला 1 मिनिटांत 50 हजारांचे कर्ज मिळेल, सरकारने छोट्या दुकानदारांसाठी योजना बनविली आहे. कोरोनामुळे अनेक लोक त्यांचा व्यवसाय गमावून बसले आहेत, विशेषत: लहान दुकानदार अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ अनुदान कर्ज देत आहे. या योजनेंतर्गत कर्ज देण्याबाबत बँकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत ई-मुद्रा कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) घेता येईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या भोवती फिरण्याची गरज नाही. आपण घरी बसून या कर्जासाठी अर्ज करू शकता. आपण या योजनेबद्दल बोलण्यापूर्वी आपण पंतप्रधान मुद्रा लोनबद्दल थोडेसे सांगूया SBI mudra loan.  मुद्रा SBI mudra loan म्हणजे मायक्रो-युनिट डेव्हलपमेंट अँड रीफाइन्स एजन्सी. या योजनेंतर्गत सूक्ष्म युनिट्सना कर्ज सहजपणे दिले जाते ज्यात संस्था, कंपनी किंवा स्टार्टअप काहीही करु शकते. या योजनेत सरकार ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ या तीन...

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग Skill Development & Entrepreneurship.

Image
  कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग      : केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेला "राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम" हा आपल्या देशातील  युवकांना आवश्यक कौशल्ये देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी काम करत आहे.   जेणेकरून ते राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या रोजगारक्षम तरुणांमध्ये बदलतील.  संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात इन्स्टिट्यूटमधील कौशल्य विकास आणि उद्योजकता सेल युवकांना सरकारी अनुदानित कौशल्य अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देत आहे.  संप्रेषण कौशल्ये, उद्योजकीय कौशल्ये, व्यवसाय निर्मिती कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास,  इंग्रजी संभाषण कौशल्ये, वेळ व्यवस्थापन कौशल्य, प्रेरणा कौशल्य, संगणक कौशल्ये,  तांत्रिक  कौशल्य, जीवन कौशल्ये, आरोग्य आणि निसर्गाबद्दल जागरूकता, सुरक्षितता कौशल्य, मुलाखत कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्य. यांसारखे विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देवून रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन केलेजात आहे. उद्योग निर्मिती, स्टार्ट-अप, इत्यादींसाठी 'मुद्रा योजना' सारख्या विविध सरकारी अर्थसाह्य  योजनांची माहित...

मा. अण्णा हजारे....

Image
  मा. अण्णा हजारे....      किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७: भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र ). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक रितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स...