सत्य...
सत्य आणि प्रामाणिकपणा हे मानवी जीवनाचे मूलभूत मूल्य आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती सत्य बोलतो आणि प्रामाणिकपणाने वागतो, आपले कर्तव्य पूर्ण करतो तेव्हा तो समाजामध्ये विश्वासार्ह ठरतो. सत्य हे जरी कधी कधी कठीण वाटत असले, तरी दीर्घकालीन यशासाठी तेच खरी वाट असते. प्रामाणिकपणा म्हणजे केवळ खरे बोलणे नव्हे, तर आपल्या कर्तव्यात, कृतींमध्येही पारदर्शकता राखणे होय. महात्मा गांधींनी त्यांच्या संपूर्ण जीवनात सत्य आणि प्रामाणिकतेचे आचरण केले आणि त्यामुळेच त्यांचं नेतृत्व लाखो लोकांना प्रेरणा देणारे ठरले. त्यामुळे, सत्यावर आधारित जीवन जगणे म्हणजेच आत्मसन्मानाने आणि इतरांचा आदर मिळवत जगणे होय. सत्याचा नेहमीच विजय होतो सत्यमेव जयते...